Pages

Popular Posts

Saturday, December 18, 2010

अशीच यावी तु...

अशीच यावी तु...मनाने धुंदीत गान गावे
होऊन पाखरु त्याने जाऊन मग आकाशी भिडावे

अशीच यावी तु... मग सरिलाही विसर पडावा
तुझ्याच गालावर पडण्या तिचाही प्रत्येक थेंब चिंब व्हावा

अशीच यावी तु...कळीलाही जेव्हा गंध नसावा
होऊन फ़ुल तिने सुगंध तुझाच लपेटुन घ्यावा

अशीच यावी तु...मलाही जेव्हा ठाउक नसावे
स्वप्नांतुन बाहेर येता समोर पुन्हा तुच दिसावे

अशीच यावी तु...त्या चांदराती चंद्रालाही भुल पडावी
पाहुन तुज मिठीत माझ्या त्यालाही चांदणीची आठवण व्हावी...
 
--sandeep

Monday, December 6, 2010

केव्हातरी पहाटे....

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?


SURESH BHAT

मनातल प्रेम

मनातल प्रेम
   सल्या-बसल्या एकांतात एकाचा अंत होतोय
                    संतांच्या भूमितला साधा माणूस एकदम संथ होतोय
               विचारांच्या कुंपणातल्या चारयावाचून कुंपण खातोय 
                      वैभावातल्या दिनाला तुज्या मुळेच तर सुदैव लाभतंय
               तारकांच्या जगण्याला तार्यांच तोरण लाभतंय
                      मनासारखं जगण्याला मनातलाच प्रेम लागतंय

चारोळी

चंद्र!चे चांदणे एकवेळ त्याला सोडून निघून जाईल,
माझे शरीर एकवेळ श्वास घेणे सोडून देईल,
पण माझ्या मनाच काय करू…
ते तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहील…..





त्याच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ
डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ...
त्याच्यावर खरे प्रेम केले
हे त्याला पटवून कसे देऊ.....
 
 
 
डोळ्यातले अश्रू  पुसू शकते ,
मनातले अश्रू  पुसू कसे,
तुज्यावर आकंठ प्रेम करणार्‍या…
या जिवाला तुझ्या पासून दूर ठेवू कसे…
 
 
 
तुला  मिळाले  सर्व  काही.
म्हणजे  बाकीचे  कोणीच  नाहीत.
वरच्याचा  आहे  न्याय  आगळा.
प्रत्येकात  वसतो  गुण  वेगळा.
 
 
 
मी पाहिलय तुला
मला सोडुन् जाताना....
स्वत:च्या डोल्यातुन
तुला वाह्ताना.....
 
 
 
भावना अन् वस्तुस्थिती
यात छोटी गफलत असते,
मनाच्या प्रांगणात
भावनाच वस्तुस्थिति असते.

चारोळ्या

प्रत्येकाला आशा असते
आशेवरच जो तो जगत् असतो
हाती काही ही नसले तरी
सुंदर स्वप्न बघत असतो


सगळे काही विसरून चाललोय
जग तुझे सोडून
फक्त एकच सांग काय मिळा व ल स
माझ्याशी आस वागूण


स्वप्न आसत आपल
आपणच ते रंगवत आसतो
हव तिथे हवा तसा
छान छान रंग भरत आसतो


नाही निभावता येत तुला
तर वचन देतेस कश्याला ?
रडवुनच जायचे आसते न तुला
तर हसत येतेसच कश्याला ?


जिथे शब्दांना असतो मान
तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांचावर विश्वास
तेच करतात विश्वासघात


आठवते मला तुझे हसने,
अन् गोड मधुर वाणी…
क्षणिक सुखाचे ते दिवस आठवले की…
डोळ्यात येते पाणी…